पालघर नागरी कृती समितीचे निवेदन जिल्हाधिकारी ईंदुराणी जाखड यांना सादर – माजी राज्यमंत्री मनीषाताई निमकर व सौ. शालीनीताई मेमण यांची उपस्थिती

पालघर:
आज सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी पालघर जिल्हाधिकारी मा. श्रीमती ईंदुराणी जाखड यांना पालघर नागरी कृती समितीतर्फे निवेदन सादर करण्यात आले. या वेळी माजी राज्यमंत्री श्रीमती मनीषाताई निमकर व सौ. शालीनीताई मेमण यांची उपस्थिती होती.

निवेदनामध्ये खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या –

  1. पालघर स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय सध्याच्या जागेतून हटवून तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस हलविण्यात यावे.
  2. पालघर स्टेशनलगतची १८ गुंठे पीडब्ल्यूडीची जागा पालघर नगरपरिषदेकडे वर्ग करून बसस्थानक, दुकाने, मोटरसायकल स्टँड व व्यापारी इमारत उभारण्यात यावी, ज्यातून नगरपरिषदेला उत्पन्न मिळेल.
  3. जुने पालघर येथे अत्याधुनिक मच्छीमार्केट उभारून त्यात कोल्ड स्टोरेजची सोय करावी. वरच्या मजल्यावर प्राणी व कुक्कुट पक्षी वधासाठी स्वतंत्र जागा व पशुवैद्यकीय तपासणीची व्यवस्था असावी.
  4. पालघर ते बोईसर रस्ता विकासाच्या दोनशे कोटी रुपयांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून कारवाईची मागणी.

पालघर नागरी कृती समितीने इशारा दिला आहे की, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button